Monday, May 18, 2020

संजय राऊत यांचं परप्रांतीयांवरचं वक्तव्य

संजय राऊत यांचं परप्रांतीयांवरचं वक्तव्य त्यांच्या पक्षाची केविलवाणी अवस्था दर्शवणारं आहे.
_____________________________
संजय राऊत म्हणतात :
मुंबईतून परप्रांतीय मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. आता त्यांच्या जागा मराठी तरुणांनी घ्यायला हव्यात, संधी आली आहे असे सांगितले जात आहे. ते तितकेसे खरे नाही. जे निघून गेले ते सर्व असंघटित, रोजंदारीवर काम करणारे होते. मुंबईच्या आर्थिक नाड्या आजही परप्रांतीयांच्याच हाती आहेत हे सत्य कसे नाकारणार? अशी रोखठोक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
_____________________________
याचाच अर्थ यांचा पक्ष कधीही मुंबईतलं चित्र बदलवणार नाही! ना त्यासाठी प्रयत्न करणार, परत टीका झाल्यावर शिवसेनेला अक्कल शिकवू नये म्हणून प्रतिक्रिया उमटतील. मी आधीही म्हणालो, मुंबईत ५० लाखापेक्षा जास्त परप्रांतीय आहेत, त्यातले काही लाख जातील, कोण आणि कोणत्या क्षेत्रातले लोक जाणार/गेलेत असं कुणालाही आत्ता सांगता येणार नाही. कारण आपल्याकडे डाटाच नाही. मुंबईत काहीच बंद पडणार नाही पण संधी निर्माण झाली हे खोटं आहे काय?
आपल्याला आपल्या मराठी बेरोजगारांना कामं देण्यासाठी पद्धतशीर योजना असायला हवी. सरकारच्या गोटातून तश्या काही बातम्यापण आल्यात, सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे दोघे भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सकारात्मक वाटतात आणि त्याचवेळी संजय राऊत परस्परविरोधी वक्तव्य करतात.

याचे दोन अर्थ आहेत.

१. लोकांची मागणी आहे, दबाव आहे म्हणून सरकार आपली समजूत काढायला उगाच डायलॉगबाजी करते आहे.
२. शिवसेनेतील नेत्यांमध्येच ताळमेळ नाही.

आणि दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार मराठी युवकांसाठी अत्यंत नुकसानकारक आहेत.




मंदिरे हीच समाजकल्याणाची भक्कम केंद्रबिंदू आहेत.

मंदिरे हीच समाजकल्याणाची
भक्कम केंद्रबिंदू आहेत.
_____________________
हिंदू मंदिर! प्रत्येक हिंदूच्या जिव्हाळ्याचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा असतो. कोणत्या ना कोणत्या मंदिरावर, देवस्थानावर आपली श्रद्धा असते. कुठेच न झुकणाऱ्या मानादेखील पंढरपूरच्या विठोबासमोर नतमस्तक होतात आणि ही मंदिरे आपल्याला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा देऊन जातात.
पण आपल्या समाजात मंदिरे न आवडणारे, आपले देव न आवडणारे, आपला हिंदू धर्म न आवडणारे, हिंदू विरोधकदेखील अनेक आहेत. बरं हे नुसतेच विरोधक नसून सतत आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना नकारात्मक बनवण्याच्या मागे हात धुवून लागेलेले असतात त्यामुळेच आपण हिंदू सण साजरा करण्याच्या आनंदात मश्गुल असतो आणि हे नमुने, संबंधित सण साजरा करू नका म्हणून कंड्या पिकवत असतात. यातले अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसशी जोडलेले असतात याची आपल्याला कल्पनाही असत नाही.
गेल्या काही वर्षात अश्याच असमाधानी, असंतुष्ट, अपप्रचाराला बळी पडलेल्या अनेकांनी सतत मंदिरांमधील सोन्याबाबत बऱ्याच खऱ्या-खोट्या बातम्या पसरवल्या. हिंदू मंदिरांमध्ये मजबूत दानधर्म होतो आणि मंदिरे ही संपत्ती दाबून ठेवतात असा अपप्रचार सतत होत राहिला तर एक दिवस मंदिरांमधील या संपत्तीसाठी हाणामाऱ्या होताना पहाव्या लागल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही.
मुळात या विरोधाला कसलाही फॅक्टसचा आधार असत नाही. अनेकांना हे देखील माहिती असत नाही की हिंदू मंदिरे हजारो किलो सोने नियमितपणे सरकारकडे डिपॉजिट करतात, सर्वच्या सर्व सोनं, अलंकार डिपॉजिट करणे शक्य असत नाही. ही मंदिरे प्रत्येक नैसर्गिक संकटाच्या वेळी कोट्यावधी रुपयांची मदत सरकारला करतात. पण तरीही या लोकांमध्ये हिंदूंबद्दल असंतोष आणि असूया असतेच!
अजून खोल निरीक्षण केल्यास, ज्यांना मंदिरे आवडत नाहीत, जे हिंदू विरोधक आहेत, त्यांच्या देशावरच्या निष्ठा तपासल्यास अनेकदा भुईमुगाच्या शेंगाच हाती लागतात. मग जेव्हा बालाकोटसारख्या घटना घडतात तेव्हा अश्या लोकांचा भारत-विरोध शत्रूसाठी स्कोअरींग पॉईंट ठरतो. नेहमी ट्विटरवर असाल तर अनेक भारत विरोधी गोष्टींसाठी हजारोंचे ट्रेंड बघायला मिळतील.
यावर उपाय काय? तर यावरचा 'एक' उपाय स्वतः हिंदू मंदिरांकडेच आहे! हा असंतोष कमी होईल किंवा आपली फॉलोविंग वाढेल, यासाठी मंदिरांनी स्वतःला अपडेट ठेवणे, आधुनिकतेकडे वळणे गरजेचे आहे. प्रत्येक मंदिरासाठी, प्रत्येक देवस्थानासाठी मोठे दबाव गट बनणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मंदिरांनी हुशारीने खेळणे गरजेचं आहे.
लक्षात ठेवा, मंदिरे ही समाजकल्याणाची केंद्रबिंदू आहेतच पण अधिकाधिक सक्षम व्हावीत!
असं झालं तर आहे तो विरोध, असंतोष कमी होईल नाहीतर तो कायम कागदावरच सडत राहील, त्याकडे दुर्लक्ष करता येईल.
काय करता येईल?
सर्वप्रथम देवस्थानांच्या ट्रस्टसने डावं-उजवं राजकारण काय प्रकार आहे हे नीट समजुन घ्यायला लागेल! आपलं मंदिर ज्या गावात, शहरात असेल तिथल्या पंचक्रोशीतील समाजकारणाचा, राजकारणाचा मजबूत अभ्यास करावा लागेल, मंदिरांचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावं लागेल.
● प्रत्येक देवस्थानाने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणे गरजेचेच आहे. आपला ऐतिहासिक ठेवा, मग फोटो असतील, वस्तू असतील, जुनी भांडी असतील, ऐतिहासिक पत्र व्यवहार असतील, देवांचे अलंकार असतील, नेहमी मिळणाऱ्या भेटवस्तू असतील, अर्काइव्हज असतील बाहेर काढा, सोशल मीडियावर नियमितपणे त्याचे फोटो टाका, लाइव्ह दर्शन सुरू करा. फक्त रोजचा एक फोटो टाकला म्हणजे जबाबदारी संपली असं होत नाही.
● देवस्थान करत असलेल्या सामाजिक कार्याची वेळोवेळी माहिती द्या, मंदिर ट्रस्ट चालवत असलेल्या वृद्धाश्रमांची, अनाथालयांची माहिती समोर येऊ द्या. देवस्थानची लोकप्रियता आणि फॉलोवर्स अधिकाधिक कसे वाढतील यावर लक्ष द्या. सोशल मीडियाचा फायदा म्हणजे संबंधित देवस्थानचे विदेशातील फॉलोवर्सदेखील जोडायला मदत मिळू शकेल.
● मंदिरांसोबतच असंख्य हिंदू संतांचं काम जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेणेदेखील तितकेच आवश्यक आहे. ही जबाबदारी हिंदू बांधवांनी उचलणे गरजेचे आहे.
● बहुसंख्य मंदिरे, देवस्थान ट्रस्टस मंदिराच्या परीसरातच धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, नववर्ष यात्रा, ग्रंथालय, अन्नछत्र असे उपक्रम गेली कित्येक वर्षे राबवत आहेत, जे कौतुकास्पद आहे. पण हे लोकांच्या सतत डोळ्यासमोर असू द्या. आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचत नसेल तर ते आपलं अपयश आहे. मग आपण मोदींकडून काय शिकलो? सामाजिक कामाची जाहिरात होणे त्यातून इतरांना ऊर्जा, प्रेरणा मिळणे गरजेचे आहे. काही मंदिरे जर सरकारी हस्तक्षेपामुळे बॅकफूटवर असतील तर त्यांनी इतर मंदिरांपासून आदर्श घेऊन काम करावे.
● किती मंदिरांनी कोरोना काळात आर्थिक आणि अन्नधान्याच्या बाबतीत मदत केली माहिती आहे?
१. कांची मठ
२. महावीर मंदिर ट्रस्ट
३. माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्ट
४. महामाया मंदिर ट्रस्ट
५. सोमनाथ मंदिर ट्रस्ट
६. अंबाजी मंदिर ट्रस्ट
७. श्री. साईबाबा संस्थान ट्रस्ट
८. देवस्थान मॅनेजमेंट कमिटी - कोल्हापूर
९. बाबा रामदेव
१०. स्वामी नारायण मंदिरे
११. मन्नरगुडी जियार स्वामी
१२. राणी सती मंदिर
१३. श्री. माता मनसा मंदिर
ई. ई. ई.
ही केवळ माहिती असलेली नावे आहेत..अशी असंख्य मंदिरे आज आपली सामाजिक जबाबदारी ओळखून काम करत आहेत.
● आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काही ठराविक घटना असतात, उदा. शिक्षण, नोकरी, लग्न, आरोग्य. यातील नोकरी, बेरोजगारी या मुद्द्यासाठी जर देवस्थान ट्रस्टसने विशेष प्रयत्न केले तर देवस्थानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला अजून मदत मिळेल.
● एखाद्या हिंदू संस्थेकडून/ट्रस्टकडून/मंदिराकडून आपल्याला काही फायदे मिळाले, त्यावर आपण आयुष्यात उभे राहू शकलो ही कृतज्ञतेची भावना, अँटी हिंदू सेंटीमेंटशी लढायला मदत करेल. लोकांना देववेडे न बनवता देखील देश आणि धर्माशी लोक अप्रत्यक्षरित्या जोडता येतील.
हे सर्व केवळ, भक्कम दबाव गट बनण्यासाठी! अजून पुढे जाऊन सांगतो, नरेंद्र मोदी निवडून येण्यात त्यांच्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणाऱ्या घटकांचा तितकाच मोठा हात आहे. मंदिरे, देव, धर्म त्या अनेक उत्प्रेरकांपैकी एक आहेत. काही केल्या मोदी हटत नाही म्हटल्यावर जसे मोदी समर्थकांवर हल्ले सुरू झालेत, संतुलित आणि फॅक्ट मांडणाऱ्या पत्रकाराना वाळीत टाकण्याचे उद्योग सुरू झालेत तसेच भविष्यात अश्या उत्प्रेरकांवर हल्ले सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वी केरळमध्ये भर चौकात केवळ खुन्नस म्हणून वासरू मारलं गेलंय! हे आम्ही अजून विसरलो नाहीत.
मंदिरांनी लक्षात ठेवावं की मंदिरे हिंदू द्वेषाला, हिंदू विरोधी राजकारणाला गेली शेकडो वर्षे बळी पडली आहेत, मंदिरे तोडली गेलीत, देवतांच्या मूर्ती फोडल्या गेल्यात, आता वेळ आहे मंदिरांनी मुत्सद्देगिरी आणि राजकारण करायची. प्रत्येक लढाई ढाल-तलवार हातात घेऊन लढली जाऊ शकत नाही, २०२० मध्ये तर नाहीच!


कौशल ईनामदार

'उबुंटू' चित्रपटातली 'हीच आमुची प्रार्थना' ही प्रार्थना काय सुरेख कम्पोज केली आहे, एकदा ऐकायला लागल्यावर ऐकतच रहावंसं वाटतं. खाद्य पदार्थांमध्ये जसा Temptative प्रकार असतो तशीच ही मराठी प्रार्थना मला Temptative वाटते.
'लाभले आम्हास भाग्य', 'हीच आमुची प्रार्थना', 'चिन्मया सकल हृदया' अशी सर्व गीते एकाच संगीतकाराने म्हणजे कौशल इनामदार यांनी कम्पोज केलेली गीते आहेत हे विशेष.
मजेशीर गोष्ट म्हणजे 'चिन्मया सकल हृदया' साठी आनंद भाटे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण कौशल इनामदार यांना पुरस्कार मिळाला नाही-कारण होतं, पुरस्कार देणाऱ्या समितीला वाटलं की हे गीत मूळ बालगंधर्वांचं आहे, पण 'चिन्मया सकल हृदया' कौशल इनामदार यांनीच कंपोज केलेलं होतं.
कौशल इनामदार कमी काम करतात पण रोबस्ट काम करून ठेवतात, अजरामर 🙏
अपडेट : चिन्मया सकल मध्ये मित्रवर्य Prasad Vilas Padhye यांनी तबल्यावर साथ संगत केलेली आहे.

Go Vocal For Local - 1

|| Go Vocal For Local ||

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना महिंद्रा स्कॉर्पिओ वापरत आणि फ्रंट सीटवर बसत. पंतप्रधान झाल्यावर एसपीजी-special protection group च्या सल्ल्यानुसार भारतीय पंतप्रधानांसाठी अधिक सुरक्षित म्हणून बीएमडब्ल्यू निवडावी लागली.



मंदिरातले दागिने

जनरली सर्वच मंदिरात आलेल्या
दागदागिन्यांचे चार प्रकार असतात.
१. पूजेची भांडी
२. दुर्मिळ नाणी, मौल्यवान रत्न
३. सोन्याची बिस्किटे
४. सोन्याचे बारीक तुकडे, सोन्याचे पत्रे
पहिल्या दोन प्रकारातील सोनं कोणत्याही स्कीम मध्ये सरकारला देणं शक्य असत नाही, हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असतो.
भाविक मंदिरांना दान करताना, देवाला भेट दिली अशी भावना असते, ट्रस्टला देणगी म्हणून सोन्याचे दागिने दिले जात नाहीत.
तरीही मोदी सरकारने २०१६ मध्ये 'गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम' आणल्यावर त्यात ८ मोठ्या मंदिरांनी आपलं सोनं जमा केलं. चार मंदिरे तामिळनाडूतली होती, २ महाराष्ट्रामधली, १ आंध्र प्रदेश आणि १ जम्मू काश्मीर मधील मंदिर होतं.
तिरुपती बालाजी मंदिराने बहुधा याच स्कीममध्ये १२०० किलो सोनं डीपॉजीट केलेलं होतं. बालाजी मंदिराने जवळपास ७२३५ किलो सोनं आधीच दोन राष्ट्रीयकृत बँकांकडे डिपॉझिट केलेलं आहे!
तरी आज मंदिरांकडून अपेक्षा करताय?
अजुन हिंदूंनी देशासाठी काय केलं पाहिजे?

Go vocal for local

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अमुक परदेशी उत्पादन वापरतात आणि इतरांना देशी उत्पादने वापरा म्हणतात, असे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. अरे बाबांनो तुम्हाला देशी उत्पादने वापरणे अनिवार्य केलेलं नाही, तुम्ही आमच्या नाकावर टिच्चून महागडी, परदेशी उत्पादने वापरा, आमची काही हरकत नाही.
कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभी करायची असल्यास अधिकाधिक देशी उत्पादने वापरा जेणेकरून आपला पैसा आपल्या देशातच राहील. देशाची अर्थव्यवस्था भक्कम होईल, असं अर्थतज्ञ सांगतात. भारतीय ब्रॅंड वापरले तर संबंधित उत्पादनाशी संबंधित सर्वच घटक मग कच्चा माल पुरवणारे असतील, स्पेयर पार्ट्स बनवनारे असतील मार्केटिंग वाले असतील अश्या सर्व स्टेक होल्डर्सचा फायदा होत असतो, त्यांना काम मिळतं, त्यांच्या खिशात चार पैसे जातात, सर्वांचाच आर्थिक फायदा होतो.
परंतु हे खरं असलं तरी मोदींनी कुठेही म्हटलं नाही की परदेशी उत्पादने वापरू नका. समोरच्या व्यक्तीने काय सांगितलं आहे, लक्ष द्यायचं नाही, वेड घेऊन पेडगावला जायचं, सुवर्णमध्य न साधता टोकाच्या भूमिका घेणं गरजेचं आहे काय? नका वापरू देशी उत्पादने. मी म्हणतो आत्मनिर्भर मुद्द्यावरून भारताला हिणवणाऱ्यानी एकही देशी उत्पादन वापरू नका! अशी टोकाची भूमिका आम्ही घेतली तर तुम्हाला जगणं मुश्किल होईल. तुम्ही १००% परदेशी उत्पादने वापरू शकता काय?तुम्ही देशी उत्पादनांवर बहिष्कार घालूनच दाखवा... तुमच्या मोहनदास गांधींनी, आमच्या स्वा. सावरकरांच्यानंतर परदेशी कापडांची होळी केली होती आता तुम्ही देशी उत्पादनांची होळी करा.
आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला खरेदीच्यावेळी भारतीय उत्पादने निवडण्यासाठी मदत म्हणून मार्गदर्शक तक्ता खाली दिलेला आहे. याशिवाय एखादं उत्पादन भारतीय आहे किंवा नाही, यासाठी गुगल मारून चेक करू शकता.
सद्य परिस्थितीत माझा ऍप्रोच तरी,
१. आधी अपेक्षित उत्पादनाचा ब्रँड देशी आहे का बघा.
२. देशी नसेल तर, भारतात कारखाने आहेत का? इथल्या किती लोकांना नोकरी मिळते आहे बघा, उदा. हिंदुस्थान युनिलिव्हर सारखी कंपनी असेल, जी गेली कित्येक वर्षे आपल्याकडे स्थायिक आहे, हजारो भारतीयांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, या मुद्द्यांवरून ब्रँड निवडावा
३. शेवटी चांगला, सक्षम पर्यायच नाही, असं निदर्शनाला आल्यास परदेशी पर्याय निवडावा.
खालील तक्त्यामध्ये काही चुका, सुधारणा असतील तर कळवा.


Sunday, May 10, 2020

मौलाना सादची ऑडिओ क्लिप - Fact Check

मरगझ निजामुद्दीनच्या मौलाना सादची ऑडिओ क्लिप, ज्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू नका, म्हणून सांगितलं होतं, व्हायरल झाली होती त्यावर इंडियन एक्स्प्रेसने ९ तारखेला बातमी केली.
बातमीत सांगितलं : पोलिसांनी केलेल्या तपासात आढळलं की क्लिप डॉक्टर्ड आहे.
या बातमीचं दिल्ली पोलिसांनी तातडीने खंडन करत, ही बातमी साफ खोटी आहे म्हणून सांगितलं आहे.
साधारण २४ तासात ट्विटरवरच्या फ़ुरोगामी लोकांनी ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरवली. पण बातमी खोटी निघाली म्हटल्यावर आम्ही पोस्ट केलेली बातमी खोटी होती, असं ट्विट करण्याचं धाडस कुणीही दाखवलं नाही.
जे जे नियमबाह्य, देशविरोधी अश्या सर्व घटकांच्या बाजूने हे लोक उभे राहतात आणि ट्रोल झाल्यावर बीजेपी आयटी सेलच्या नावाने खडे फोडतात.